Wednesday, 29 August 2012

जिंकतो तोच

नांगराचा फाळ निष्ठुरपणे
मातीचा उर चिरत जातो
मोकळ्या ढाकळ्या त्या तनुत
मग हिरवागार कोंब फुलतो

टाकीचे मस्तकावरील घाव
दगड किती निर्धाराने सोसतो
तुकडे कपचे पडत त्याला
ईश्वराचा  आकार येतो


अस्तित्वावर होणा-या घाल्यांनी
अभिमान राख राख होतो
त्या सत्वहीन राखेतुनच पण
फिनिक्स  नवी भरारी घेतो

नवनवे आघात पचवूनच
मनास एक कणखरपणा  येतो 
अडचणींचे डोंगर खोदुनच
मनगटात नवा जोश येतो

या  संकटांनी मग तुही
कशाला खचून जातो
' जिंकतो तोच ' नव्या उमेदीने
काळाशी जो टक्कर देतो


            -सुहास भुसे
       







No comments:

Post a Comment